22 जुलै 2009 च्या खग्रास सूर्यग्रहणाची तपपूर्ती

आकाशमित्रच्या संस्मरणीय ग्रहण सहलीतील ही 2009 ची सूर्यग्रहण निरीक्षण सहल.

माेने सर व गाेखले सरांच्या पायलट ट्रीपनंतर जबलपूर हे ठिकाण नक्की झालं हाेतं.

नेहमीप्रमाणेच एक दिवस अंगावर ठेवून आकाशमित्र मंडळाचे सभासद व त्यांचे कुटुंबीय, स्नेही हे 20 जुलै 2009 च्या रात्री कल्याणहून रेल्वेने निघाले.

भर जुलै महिन्यात हे ग्रहण.त्यामुळे दिसण्याची शक्यता कमीच हाेती. परंतु खग्रास सूर्यग्रहणाचा थरार हा वेगळाच असताे. त्यामुळे ताे पहाण्यासाठी चान्स घ्यायला हरकत नव्हती. खग्रास ग्रहण बहुतेकांनी पाहीलेलं नसल्याने उत्सुकता खूपच हाेती. बराेबर अनुभवी मंडळी हाेती.त्यांच्याकडून ती वर्णनं ऐकून काहीतरी चमत्कार हाेऊन पावसाळ्यातील हे ग्रहण दिसावं हीच आस मनात बाळगून हाैशी अभ्यासकांचा ताफा मार्गस्थ झाला.

दुसऱ्या दिवशी 21 जुलैला जबलपूरला पाेहाेचल्यावर तिथलं संपूर्ण ढगाळ वातावरण व रिमझिमणारा पाऊस बघितल्यावर मनात शंकेच्या पाली चुकचुकायला लागल्या हाेत्या. परंतु उघड काेणीच बाेलत नव्हतं.

तिथल्या दत्तमंदिरात मुक्काम हाेता. दुपारी विश्रांतीनंतर काही जणांचा एक चमू ग्रहण निरीक्षणासाठीच्या जागेची पहाणी करायला निघाला. 

सकाळी  लवकर असलेली ग्रहणाची वेळ, पूर्व दिशा इ. गाेष्टींना धरून जबलपूरमधील काही मैदानं, माेकळ्या जागा, उंचावरील एक गढी इ. पाहून शेवटी गीता मंदिरा शेजारील माेकळ्या मैदानाची जागा मुक्रर झाली.

सायंकाळी जबलपूरमधील स्थानिक हाैशी मंडळींच्या एका सभेत माेने सर, गाेखले सर, शिशिर व अभय ह्या मान्यवरांनी बरीच माहीती दिली. शंकांचं निरसन केलं. याेग्य काळजी घेऊन हे ग्रहण पहावं असं आवाहनही केलं.

दुसऱ्या दिवशीचं हवामान, वातावरण ह्याबद्दल इंटरनेटवरून जाणून घेण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू हाेता. 

डाेळे मिटून पडल्यावर देखिल झाेप लागलेली मंडळी फारच कमी. 

22 जुलैची पहाट झाली. पहाटे चार वाजता बाहेर आकाश निरभ्र झालं हाेतं. चमकणारे तारे पाहून उत्साह संचारला.ग्रहण दिसू शकतं ही आशा बळावली. सगळेजण भराभर आवरायच्या मागे लागले.

सात वाजता बाहेर पडायच्या वेळेस मात्र चित्र पालटलं हाेतं. पहाटेचं निरभ्र आकाश आता संपूर्ण अभ्राच्छादित हाेतं. बसमधून मंडळी निघाली. ठरलेल्या ठिकाणाच्या एक कि.मी. आधीच पाेलीसांनी बस थांबवली. नर्मदेवर पवित्र स्नानासाठी जाणारी गर्दी आवरण्यासाठी वाहनांसाठी रस्ता बंद केला हाेता. इलाज नव्हता. सर्वजण पायी निघाले.

मैदानात पाेहाेचल्यावर ढगाळ हवामानाने सूर्गग्रहण दिसण्याची शक्यता पूर्ण  मावळली हाेती. वेळ झाली.  अचानक गाेखले सरांचा आवाज आला.पश्चिमेला ताेंड करा. आणि एक वेगळाच अनुभव आला. पश्चिमेकडून पूर्वेकडे झपाट्याने सरकणाऱ्या चंद्राच्या सावलीने  भर दिवसा रात्रीसारखा अंधार केला. आजूबाजूच्या घरातील दिवे लागले. 

हा अनुभव ग्रहणाएवढाच थरारक हाेता. 

ग्रहण नाही दिसलं पण हाही अनुभव कमी नव्हता.

आकाशमित्रच्या ग्रहण सहलींमधलं नियाेजन, काैटुंबिक वातावरण ज्येष्ठांचं मार्गदर्शन ह्यामुळे अशा सहलींना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळताे.