आज कल्याणकरांनी अनुभवला ‘शून्य सावली दिवस’

आज कल्याणकरांनी अनुभवला ‘शून्य सावली दिवस’

सुभेदार कट्टा आणि आकाशमित्र मंडळ तर्फे कल्याण येथील सुभाष मैदानात शून्य सावली दिवस अनुभवला.
आज कल्याणकरांनी अनुभवला ‘शुन्य सावली दिवस’. माध्यांनिचा सुर्य डोक्यावर आला असताना ही स्थिती वर्षातुन दोनदा येते,दुपारी १२.३५ वाजल्या नंतर ….प्रत्यक्षपणे ही घटना आज उपस्थित खगोल प्रेमीनी सुभाष मैदानात अनुभवली,
आकाशमिञ संस्थेतर्फे श्री.विद्येश कुलकर्णी सरांनी ही खगोलीय घटना कां घडते हे विषद केले.
आकाशमिञचे श्री.संजय भाटे,श्री.संजय पांडे यांनी चर्चेत सहभाग घेतला,श्री.आर्चित गोखले हे मुलुंडहुन आले होते.
सुभेदार वाडा कट्ट्या तर्फे श्री.दिपक जोशी श्री.आमोद काटदरे ,ज्येष्ठ नागरिक संघाकडुन श्री.माधव नेने,सामाजिक कार्यकर्त्या सौ.विद्या धारप व त्यांचे विद्यार्थी आले होते.
ह्या भौगोलिक घटनेला जाणकार कल्याणकरांनी व विद्यार्थ्यानी चांगली उयस्थिती नोंदवली.